u/Patient_Tour17

काल ठकीशी संवाद या मराठी नाटका चा अंतिम प्रयोग झाला.

काल ठकीशी संवाद या मराठी नाटका चा अंतिम प्रयोग झाला.

नाटकाची पार्श्वभूमी: - ठकिशी संवाद हे मराठी मध्यमवर्गीय बुद्धिजीवीच्या “भूमिकाहीनते”वरचं अत्यंत धारदार black humour आहे.

ठकीशी संवाद नाटक हे ब्लॅक ह्यूमर प्रकारातील आहे आणि त्याचा मूळ गाभा राजकीय आणि त्यावर आधारित माणसाची काही भूमिका असावी की नसावी याच्याशी आहे. हे नाटक पूर्ण कळण्यासाठी तुम्हाला राम गणेश गडकरी कोण होते , त्यांचा पुतळा का फोडला, फोडणाऱ्याचा कोणी सत्कार केला? विजय तेंडुलकर आणि बाकी नाटककार ज्यांची नावे घेतली आहेत त्यांची किमान पार्श्वभूमी माहिती असण गरजेच आहे.

त्यानंतर भारतात ज्या काही प्रमुख राजकीय घटना घडल्या त्याची थोडीफार माहिती हवी जशी की नेहरू युग, आणीबाणी, बाबरी मशीद, संघ, कारखाने,2014 मोदी लाट, अर्बन नक्षल इत्यादी. एवढ सगळ होत असताना कोणती भूमिका न घेता, सगळ्या गोष्टींना मान हलवत हो म्हणनारा म्हातारा हे प्रमुख पात्र आहे . म्हातारा

नाटकातील हा वाईट माणूस नाही, पण तो सतत:

सगळ्यांचं ऐकतो,

प्रत्येक बाजू समजून घेतो,

कुणालाही दुखवू इच्छित नाही,

पण शेवटी कोणतीच ठाम भूमिका घेत नाही.

म्हणून ठकीचा प्रश्न फार महत्त्वाचा ठरतो:

“माणसाने स्वतःची भूमिका असावी की नसावी?”

आणि इथेच “करगोटा” येतो.

करगोटा म्हणजे फक्त surveillance नाही; तो “बांधलेलं मन” आहे.

माणूस इतका गुंततो:

इतिहासात,

विचारसरणीत,

राजकीय भीतीत,

सांस्कृतिक guilt मध्ये,

सामाजिक प्रतिमेत,

की शेवटी त्याचा स्वतःचा आवाजच हरवतो.

करगोटा ईथे सर्व घटना एकत्रीत बांधण्या साठी महत्वाचा आहे. तुम्ही काही ब्लॉक ह्यूमर वाले चित्रपट पाहिले असशील जसे की दिल्ली बेली त्यात पॉट (ज्यात हिरे/टटी) असते ते सर्व स्टोरी लाँ एकत्रित बांधतो तसच येते कारगोटा राम गणेश गडकरी ते आताचा चालू काळ यांना बांधून ठेवतो. नाटकाची स्टोरी भरकटू देत नाही तर सर्व अंग सांगून जातो. आता नाटकाचे प्रयोग होणार नाहीत त्यामुळे ते पुस्तक रुपात असेल तर वाचून आनंद घ्या.

u/Patient_Tour17 — 4 days ago

भोर तालुक्यातील नसरापूर प्रकरणातील भिमराव कांबळेनी आधी एका ७०/७५ वर्षांच्या एकट्या राहणाऱ्या म्हाताऱ्या स्त्रीला तिच्याच घरात लपून आणि रात्री कोयत्याचा धाक दाखवून बलात्कार केला. म्हातारी बिचारी रातोरात मुलीकडे निघून गेली. दुसऱ्या दिवशी जावई गावात आला आणि कांबळेविरोधात तक्रार केली. म्हातारीच्या साडीला लागलेलं रक्त तिथे होतं असं साक्षीदार सांगतोय. तरीही केस कोर्टात टिकली नाही आणि त्याची निर्दोष मुक्तता झाली. ह्या प्रकरणात कांबळेच्या बायकोनी जमीन विकून त्याला वाचवला म्हणे.

दुसऱ्या प्रसंगात कांबळेनी त्याच्याच पुतणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिला ‘TV चालू करता येत नाही’ म्हणून चालू करून द्यायला घरात बोलवलं. मुलगी हुशार होती.तिनं दारात उभी राहून टीव्ही चालू करून देण्याचा निर्णय घेतला. तरीही कांबळेनी तिला घरात ओढलं आणि दार लावून कोयत्याच्या धाकानी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ती ओरडली आणि त्याला ढकलून पळाली.थोडक्यात वाचली. मुलगी धीराची होती म्हणून शिक्षण, नोकरी, pregnancy चालू असतानाही चार वर्ष जिद्दीनं कांबळेविरोधात केस चालवली. मुलीच्या घरच्यांनीही तिला साथ दिली. पेपरमध्ये बातमी आल्यावर तिला प्रश्न विचारणारे अनेक “सभ्यं” लोक होते ज्यामुळे तिला बराच मानसिक त्रास झाला तरीही तिनं जिद्दीनं केस चालवली आणि शेवटी हरली. कांबळेची सर्वात लहान सख्खी मुलगी तिच्याच वयाची आणि तिच्याबरोबर शिकणारी होती. पुतणीवर हात टाकण्याच्या पंधरा दिवस आधी कांबळेनी स्वतःच्या लहान मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. म्हणून बायकोनी तिला मावशीकडे पाठवली. पुतणी आणि तिच्या घरच्यांनी strong action घेतल्याने कांबळे त्या भागात पुन्हा फिरकला नाही. ह्या प्रकरणात कांबळेच्या बायकोने पुतणीनी जमिनीच्या भांडणातून खोटी केस केल्याचं पोलिसांना सांगितलं.

पुण्यात येरवड्यात पण कांबळेनी एका स्त्री वर जबरदस्ती करण्याचा प्रयत्नं केल्याचं पुतणी सांगते. तिथे लोकांनी त्याला कपडे काढून मारला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा कांबळेनी चार वर्षांच्या बाळावर अत्याचार करून तिला मारून टाकलं. ह्या कांबळेच्या विकृतीच्या समोर आलेल्या घटना आहेत. बोलण्याची हिंमत नसलेल्या किती स्त्रिया त्याच्या विकृतीच्या बळी असतील माहीत नाही.

कांबळेला शिक्षा झालीच पाहिजे. परंतु त्याचबरोबर ह्याआधीच्या सगळ्या केसमध्ये असलेल्या पोलिस, वकील आणि न्यायाधीशांच्या भूमिकेची सविस्तर चौकशी होऊन त्यात दोषी आढळणाऱ्यांनाही शिक्षा होणं तितकंच गरजेचं आहे. कारण सातत्याने बलात्कार करण्याची कांबळेची हिंमत वाढण्यासाठी त्याला आधीच्या केसमध्ये निर्दोष ठरवणारी व्यवस्थाही तितकीच कारणीभूत आहे.लोकांचा व्यवस्थेवर विश्वास टिकणार तरी कसा जर बलात्कारी इतक्या सहज सुटत असतील?

कांबळेच्या बायकोचं तर मला आश्चर्य वाटतं. इतका विकृत नवरा असेल तर बायकोसोबत त्यानं काय केलं असेल? स्वतःच्या मुलीवर अत्याचार होऊ नये म्हणून तिला मावशीकडे पाठवणं तिला कळतं मग इतरांच्या मुलींच्या बाबतीत ते होऊ नये हे का वाटत नाही? “असला ठरकी नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा” हा विचार का नसेल आला तिच्या मनात? माणूस किंवा स्त्री म्हणून अस्तित्व हे बायको असण्यापेक्षा जास्त महत्वाचं का वाटलं नसेल तिला? ती आर्थिकदृष्ट्या त्याच्यावर अवलंबून होती म्हणून की काय ? कांबळेच्या बायकोची पण ह्या सगळ्या प्रकरणात चौकशी होणं गरजेचं आहे. पुतणी सांगते त्याप्रमाणे तिचा त्याला अशा विकृतींमध्ये सक्रिय पाठिंबा असेल तर तिला सहआरोपी करता आलं तरी करावं.

ह्या प्रकरणातून Take Away हा आहे की ‘सहन करणं’ हा पर्याय नाही आणि नसला पाहिजे. ती पुतणी बोलली, धैर्यानं उभी राहिली, कायद्याच्या मदतीने त्याला नडली म्हणून वाचली. भले केस हरली. पण त्याच्या मनात पुन्हा तिच्या घराजवळ फिरकायची हिंमत तर नाही झाली. ‘बोल’ ह्या चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक वाक्य आहे. “The problems in our community are not ending coz we don’t speak up.” Speaking up is the first preventive measure. चुकीच्या गोष्टींविरोधात बोलणं हा पहिला प्रतिबंधात्मक उपाय आहे. मग ते online trolling असो, verbal/ non verbal sexual abuse असो, बलात्कार असो, domestic violence असो किंवा sexual harassment at workplace असो. Speaking up is the most important thing. नाहीतर काळ सोकावतो. ___ स्मिता गायकवाड यांनी हे सदर लिहिलं आहे.

reddit.com
u/Patient_Tour17 — 11 days ago
▲ 134 r/Sambhajinagar_kar+1 crossposts

"Maharashtra mein rehke Marathi nahi aati? Sharm aani chahiye tumko.”

That line hit differently.

Because here we are in 2026, almost 40+ years later, and the situation doesn’t feel very different.

In Maharashtra, especially in urban areas, it often feels like:

Marathi people themselves switch to Hindi very quickly

Non-Marathi residents can live for years without learning even basic Marathi

The expectation to adapt seems one-sided

This isn’t about forcing language on anyone . it’s about respect for the local culture and identity. Every state in India has its linguistic pride, but in Maharashtra, it sometimes feels diluted.

What’s interesting is that even back in 1987, this was recognized enough to be written into a film dialogue. That means this isn’t a new issue . it’s something that has been quietly continuing for decades.

Maybe one reason is that Marathi people are generally accommodating and not very aggressive about enforcing language use. That’s a strength culturally, but it also means the issue never really gets addressed seriously.

So the question is:

Should there be more effort from non-Marathi residents to learn the language of the state they live in?

Or should things just continue as they are in the spirit of inclusiveness?

Or should political parties do the needful based on their Street power and force outsiders to learn Marathi by Hook or crook?

Just found it unfortunate and a bit surprising how a decades-old dialogue still feels so relevant today.

u/Patient_Tour17 — 13 days ago

महाराष्ट्र दिनानिमित्त काढलेली दोन भन्नाट सदरे.

पहिलं आलोक सरांचं दुसर मार्मिकच.

u/Patient_Tour17 — 14 days ago

अजून एक मोकाट कुत्रं. फरक एवढाच आहे यांनी बोलल की शांत बाकीनि बोलल की कल्लोळ.

u/Patient_Tour17 — 16 days ago

आंबेडकरांच्या विचारांचा मुक्त प्रवाह जाणून घ्यायचा असेल तर त्यांनी लिहिलेले अग्रलेख वाचणे खूप गरजेचं आहे. संपूर्ण समाजाची त्यांना असलेले आस्था त्यांच्या सक्षम विचारात आहे.

u/Patient_Tour17 — 17 days ago